शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

शरीर की शुद्धि के लिए पांच आवश्यक बातें

 

शरीर की शुद्धि कैसे करें।

    भारत में दिवाली बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। वसुभारस से शुरू होकर यह त्यौहार भाऊबीजा तक चलता है। इस त्यौहार के अवसर पर घर को रंगों से सजाया जाता है। घर की साफ-सफाई की जाती है। घर में करंज, लड्डू, शंकरपाले जैसे मीठे व्यंजन और चकलैया, चिवड़ा जैसे मसालेदार व्यंजन बनाए जाते हैं। कपड़े, गहने, पटाखे, मिठाइयाँ, नमकीन आदि खूब खरीदे जाते हैं। दोस्त और परिवार के सदस्य एक-दूसरे के घर शुभकामनाएँ देने और लेने जाते हैं। काम-धंधे के कारण बिखरे परिवार दिवाली मनाने के लिए एक साथ आते हैं। घर में खुशी और उत्साह का माहौल होता है। दीयों का जलना, पटाखे फोड़ना और मिठाइयों का स्वाद दिवाली की खुशी को दोगुना कर देता है। हालाँकि, दिवाली के इस आनंद का आनंद लेते हुए हम अपने शरीर की उपेक्षा कर देते हैं और दिवाली के बाद हमारे तन-मन पर इसके दुष्प्रभाव दिखाई देने लगते हैं। इसलिए, अपने शरीर की शुद्धि करना बहुत ज़रूरी है।

 

दुष्प्रभाव

    दीपावली के दौरान हमारी जीवनशैली पूरी तरह बदल जाती है। हमारे खान-पान की आदतें बदल जाती हैं। इस दौरान हम अनजाने में ही खुद पर ज़ोर डालते हैं और निर्धारित मात्रा से ज़्यादा खा लेते हैं। इसके कारण हमें निम्नलिखित कुछ दुष्प्रभाव देखने को मिलते हैं।

1. वज़न बढ़ना

    दिवाली के दौरान हमारे खान-पान की आदतें बदल जाती हैं। इस दौरान, खाने के अलावा, हम अनजाने में परिवार और दोस्तों के कहने पर मीठा भी खा लेते हैं। चकलैया, करंज्या, लड्डू, चिवड़ा जैसे तले हुए खाद्य पदार्थ, जिनमें चीनी की मात्रा ज़्यादा होती है, हमारे आहार में शामिल हो जाते हैं। हमें पर्याप्त नींद भी नहीं मिलती। इस दौरान जागना बढ़ जाता है। चूँकि पूरा परिवार एक साथ आता है, इसलिए गपशप और गपशप होती है, जिससे रात में सोना मुश्किल हो जाता है। ज़्यादा खाना और पर्याप्त नींद न लेना हमारे वज़न को बढ़ाता है। 

2. अवसाद

    दीपावली शुरू होने से पहले से लेकर दीपावली खत्म होने तक घर में बहुत खुशी और उत्साह का माहौल रहता है। व्यक्ति दीपावली की तैयारियों में व्यस्त रहता है। उसके बाद, दीपावली के दौरान वह अपने दोस्तों और परिवार से मिलता है और उसके दिन खुशी से बीतते हैं। इस दौरान वह खूब मौज-मस्ती करता है। घूमने जाता है। मन को प्रसन्न करने वाले व्यंजनों का आनंद लेता है। इससे उसका मन प्रफुल्लित रहता है। लेकिन दिवाली खत्म होते ही हमारी दिनचर्या फिर से शुरू हो जाती है और यह अचानक बदलाव व्यक्ति को अवसाद की ओर ले जाता है। व्यक्ति निराश महसूस करता है, जब तक उसके शरीर को जो आदत पड़ गई है, वह पुनः स्थापित नहीं हो जाती, तब तक उसके मन में निराशा बनी रहती है। इतना ही नहीं, इस दौरान किया गया खर्च और अतिरिक्त प्रयास भी व्यक्ति को उदास कर देता है।

 


शरीर की शुद्धि के लिए पांच आवश्यक बातें

1. संतुलित आहार लें

    दिवाली के दौरान बढ़े हुए वजन को कम करने के लिए व्यक्ति को पौष्टिक और संतुलित आहार लेने की आवश्यकता होती है। आहार में फल, सब्जियाँ, पत्तेदार सब्जियाँ और दालें शामिल होनी चाहिए। इससे उसे सही मात्रा में फाइबर मिलता है। कुछ दिनों तक भोजन में चीनी की मात्रा कम कर देनी चाहिए। शुद्ध सात्विक आहार बढ़े हुए वजन को कम करने में मदद करता है।

 


2. पानी पिएँ

    संतुलित आहार के साथ-साथ व्यक्ति को सही मात्रा में पानी भी पीना चाहिए। व्यक्ति को दिन भर में कम से कम आठ से दस गिलास पानी का सेवन करना चाहिए। पानी पीने से व्यक्ति का वजन सीमित रहता है। शरीर में पानी व्यक्ति को ऊर्जावान और खुश रखने में मदद करता है।




 

3. पर्याप्त नींद लेना

    संतुलित स्वस्थ आहार, आठ से दस गिलास पानी के साथ-साथ व्यक्ति को पर्याप्त नींद लेने की भी आवश्यकता होती है। दिवाली के दौरान और उससे पहले, व्यक्ति जागता रहता है। दरअसल, उसकी जीवनशैली बदल गई है। हालाँकि दिवाली के दौरान पर्याप्त नींद न मिलने का एहसास नहीं होता, लेकिन दिन में बाद में इसका एहसास होता है क्योंकि नींद की कमी के कारण व्यक्ति थका हुआ महसूस करता है। इसलिए, व्यक्ति को कम से कम सात से आठ घंटे की नींद लेना ज़रूरी है। पर्याप्त नींद व्यक्ति को तरोताज़ा करती है और उसके वज़न को भी नियंत्रित रखती है।

 

4. व्यायाम

    व्यक्ति के लिए व्यायाम करना बहुत ज़रूरी है। सुबह-शाम टहलना, योग करना, जिम जाना, एरोबिक्स करना। व्यक्ति के स्वास्थ्य के अनुकूल व्यायाम उसकी उम्र के अनुसार कम से कम 20 से 25 मिनट तक करना चाहिए। दिवाली के दौरान हम जो अतिरिक्त कैलोरी लेते हैं, वह व्यायाम करने से कम हो जाती है। बढ़ा हुआ वज़न नियंत्रित रहता है। साथ ही, नींद भी अच्छी आती है।

 

5. प्राणायाम

    शरीर के साथ-साथ मन की शांति के लिए भी प्राणायाम करना चाहिए। स्वच्छ हवा और प्रकृति के सानिध्य में किया गया प्राणायाम फेफड़ों को शुद्ध करता है। पटाखों का धुआँ फेफड़ों के ज़रिए अंदर जाता है जिससे सांस संबंधी बीमारियाँ होती हैं। इस दौरान हवा की गुणवत्ता कम होती है। प्रदूषण ज़्यादा होता है। यह धुआँ और इस दौरान की हवा न सिर्फ़ अस्थमा के मरीज़ों के लिए तकलीफ़देह होती है, बल्कि स्वस्थ लोगों के लिए भी तकलीफ़देह होती है। इसलिए प्राणायाम से फेफड़ों में साफ़ हवा जाती है और प्रदूषण बाहर निकलता है। साथ ही, यह मन को शांत करने में मदद करता है।



शरीर शुद्धीसाठी पाच आवश्यक बाबी

 शरीर शुद्धी कशी करावी.

दीपावली हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वसुबारसपासून सुरू होणारा हा सण भाऊबीजेपर्यंत चालतो. या सणाच्या निमित्ताने घराला रंगरंगोटी केली जाते. घराची साफसफाई केली जाते. घरात करंज्या, लाडू, शंकरपाळे अशी गोड आणि चकल्या, चिवडा अशी तिखट व्यंजने केली जातात. भरपूर प्रमाणात  कपडे, दागिने, फटाके, मिष्टान्न फराळ  आदी व्यंजनांची खरेदी केली जाते.  मित्र परिवारात एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि घेतल्या जातात. नोकरी व्यवसायानिमित्त विखुरलेले कुटुंब एकत्रित येऊन दीपावली साजरी करतात. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि मिष्टानाचा आस्वाद दिवाळीचा आनंद द्विगुणीत करते. दीपावलीचा हा आनंद उपभोगतांना आपल्या शरीराकडे मात्र आपले दुर्लक्ष होते आणि त्याचा दुष्परिणाम दीपावली झाल्यानंतर आपल्याला शरीर आणि मनावर दिसू लागतो. म्हणून आपल्या शरीराला शुद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. 

 

दुष्परिणाम 

दीपावलीच्या कालखंडात आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली असते. खान पानाच्या सवयी बदललेल्या असतात. या काळात नकळत आपल्याकडून अधिकचे श्रम आणि प्रमाणापेक्षा जास्त आहार आपण घेतलेला असतो.  त्यामुळे त्याचे  पुढील काही दुष्परिणाम आपल्याला दिसतात.


1. वजन वाढणे 

दीपावलीत आपल्या खानपानाच्या सवयी बदललेल्या असतात. या काळात जेवणाव्यतिरिक्त घरच्यांच्या आणि मित्रांच्या आग्रहास्तव आपण नकळतपणे गोडधोड पदार्थांवर ताव मारतो. चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा असे तळलेले, अधिक साखर असलेले पदार्थ आपल्या खाण्यात येतात. तसेच पुरेशी झोप होत नाही. या काळात जागरण वाढते. सर्व कुटुंब एकत्रित आल्याने गप्पा गोष्टी होतात  यात रात्री झोपण्यास उशीर होतो. अधिकचे खाणे आणि अपुरी झोप  त्यामुळे आपले वजन वाढते.

 

2. नैराश्य येणे. 




दीपावली सुरू होण्यापूर्वीपासून ते दीपावली संपेपर्यंत घरामध्ये अतिशय आनंद व उत्साहाचे वातावरण असते. दीपावलीची पूर्वतयारी करण्यात व्यक्ति गर्क असतो. त्यानंतर दीपावलीच्या काळात आपल्या मित्र परिवाराला कुटुंबाला भेटून त्याचे दिवस आनंदात जातात. याच काळात तो भरपूर मौज मजा करतो. फिरायला जातो. मनाला आनंद देणाऱ्या व्यंजनांचा आस्वाद घेतो. त्यामुळे त्याचे मन प्रफुल्लित राहते. परंतु जशीच दीपावली संपते त्यानंतर आपले रुटीन जीवन सुरू होते आणि व्यक्तीला अचानक झालेला हा बदल नैराश्यात नेतो. व्यक्तीला निराश वाटते त्याच्या शरीराला जी सवय झालेली असते ती सवय पूर्ववत होईपर्यंत त्याच्या मनावर निराशा दाटून राहते. एवढेच नसून या काळात झालेला खर्च आणि झालेले अधिकचे श्रम यामुळेही व्यक्ती निराश होतो. 

 

शरीर शुद्धीसाठी पाच आवश्यक बाबी . 


1. संतुलित आहार घेणे 

दीपावलीच्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी माणसाने पोषक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आहारात  फळभाज्या, पालेभाज्या आणि डाळींचा समावेश असला पाहिजे.  यामुळे त्याला योग्य प्रमाणात फायबर मिळतात. काही दिवस जेवणातील साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे. शुद्ध सात्विक आहारामुळे जे वाढलेले वजन आहे ते कमी होण्यास मदत होते.




 

2. पाणी पिणे 

संतुलित आहाराबरोबर व्यक्तीने योग्य प्रमाणात पाणी पिले पाहिजे. दिवसभर कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाण्याचे सेवन व्यक्तीने केले पाहिजे. पाणी पिल्याने व्यक्तीचे वजन मर्यादित राहते. शरीरात असणारे पाणी व्यक्तीला उत्साहीत व आनंदित ठेवण्यास मदत करते. 



 
3. पुरेशी झोप घेणे 

संतुलित सकस आहार आठ ते दहा ग्लास पाणी याबरोबरच व्यक्तीने पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. दीपावलीच्या काळात आणि त्याच्या आधीही व्यक्तीचे जागरण झालेले असते. वास्तविकत त्याची जीवनशैलीच बदललेली असते. पुरेशी झोप न होणे हे दीपावलीच्या काळात जाणवत नसले तरी नंतरच्या काळात मात्र ते जाणवते ते असे की, झोप न झाल्यामुळे व्यक्तीला थकवा येतो. म्हणून व्यक्तीने कमीत कमी सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे पुरेशी झोप माणसाचे मन प्रफुल्लित करते आणि त्याचबरोबर त्याचे वजनही नियंत्रित करते. 

 

4. व्यायाम करणे 

व्यक्तीने व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. सकाळ संध्याकाळ फिरायला जाणे, योगासन करणे, जिमला जाणे एरोबिक्स करणे व्यक्तीच्या प्रकृतीला ज्या प्रकारचा व्यायाम सूट होईल त्या प्रकारचा व्यायाम त्याने आपल्या वयोमानानुसार कमीत कमी 20 ते 25 मिनिटे करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या काळात जे अधिक च्या कॅलरीचे आपण सेवन केलेले आहे ते व्यायाम केल्याने कमी होते. वाढलेले वजन तर नियंत्रित होते. शिवाय झोपही चांगली लागते.

 

5. प्राणायाम करणे


    शरीराबरोबर मनःशांतीसाठी प्राणायाम केला पाहिजे. शुद्ध हवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात केला गेलेला प्राणायाम फुफ्फुस शुद्ध करतो. श्वासाच्या माध्यमातून फटाक्यांचा गेलेला धूर श्वसनाचे आजार निर्माण करतो, या काळात हवेचा स्तर घसरलेला असतो. प्रदूषण वाढलेले असते. ज्यांना दम्याचा आजार आहे अशांसाठी हा धूर आणि या काळातील हवा त्रासदायक तर असतेच. परंतु जे स्वस्थ आहेत त्यांनाही हे त्रासदायक असते, म्हणून प्राणायामामुळे शुध्द हवा फुफ्फुसात जाऊन दुषितपणा बाहेर पडतो. त्याच बरोबर मन ही शांत होण्यास मदत होते.




मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

How to Detox body : After Diwali

 

How to Detox body.

Diwali is celebrated with great enthusiasm in India. This festival, which starts from Vasubaras, lasts till Bhaubija. On the occasion of this festival, the house is decorated with colors. The house is cleaned. Sweet dishes like Karanja, Laddu, Shankarpale and spicy dishes like Chaklaya, Chivda are prepared at home. A large amount of clothes, jewelry, crackers, desserts, snacks etc. are bought. Friends and family members visit each other's houses to give and receive good wishes. Families scattered due to work and business come together to celebrate Diwali. There is an atmosphere of joy and enthusiasm in the house. The lighting of lamps, the bursting of crackers and the taste of desserts double the joy of Diwali. However, while enjoying this joy of Diwali, we neglect our body and its side effects start to be seen on our body and mind after Diwali. Therefore, it is very important to detox our body.

 

Side effects

During the period of Deepawali, our lifestyle changes completely. Our eating habits change. During this period, we unknowingly exert ourselves and eat more than the prescribed amount. Due to this, we see some of the following side effects.

 

1. Weight gain

During Deepawali, our eating habits change. During this period, apart from eating, we unknowingly indulge in sweet foods at the insistence of our family and friends. Fried foods like chaklaya, karanja, laddu, chivda, which contain a lot of sugar, are included in our diet, which increases our weight.

 

2. Depression





From before the start of Deepawali to the end of Deepawali, there is an atmosphere of great joy and excitement in the house. A person is busy preparing for Deepawali. After that, during Deepawali, he meets his friends and family and spends his days happily. During this period, he has a lot of fun. He goes for walks. He enjoys dishes that make his mind happy. Due to this, his mind remains cheerful. But as soon as Diwali ends, our routine life starts and this sudden change leads the person to depression. The person feels disappointed, until the habit that his body has become accustomed to is restored, disappointment remains in his mind. Not only this, but the expenditure and extra effort made during this period also make the person depressed.

 

Five essential things for body purification.

 

1. Eat a balanced diet




To reduce the weight gained during Diwali, a person needs to eat a nutritious and balanced diet. The diet should include fruits, vegetables, leafy vegetables and pulses. This gives him the right amount of fiber. The amount of sugar in the food should be reduced for a few days. A pure sattvic diet helps in reducing the weight that has been gained.

 

2. Drink water

Along with a balanced diet, a person should drink the right amount of water. A person should consume at least eight to ten glasses of water throughout the day. Drinking water keeps the weight of the person limited. The water in the body helps in keeping the person energetic and happy.

 


3. Getting enough sleep

Along with a balanced healthy diet, eight to ten glasses of water, a person needs to get enough sleep. During and before Diwali, a person is awake. In fact, his lifestyle has changed. Although not getting enough sleep is not felt during Diwali, it is felt later in the day because the person feels tired due to lack of sleep. Therefore, a person needs to get at least seven to eight hours of sleep. Adequate sleep refreshes a person and also controls his weight.

 
           4. Exercising

It is very important for a person to exercise. Going for a walk in the morning and evening, doing yoga, going to the gym, doing aerobics. The type of exercise that suits the person's health should be done for at least 20 to 25 minutes according to his age. The extra calories that we consume during Diwali are reduced by exercising. The increased weight is controlled. Moreover, sleep is also good.

 

5. Pranayama

 

Pranayama should be done for peace of mind along with the body. Pranayama done in the presence of fresh air and nature purifies the lungs. The smoke of firecrackers inhaled through the lungs causes respiratory diseases, during this time the air quality is low. Pollution is high. This smoke and the air in this time are not only troublesome for those who have asthma. But it is also troublesome for those who are healthy, so due to pranayama, clean air enters the lungs and the pollution comes out. At the same time, it helps to calm the mind.



 

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

दिवाळी अंक २०२५ - "प्रज्ञेची मुळाक्षरं"

 

दिवाळी अंक २०२५

प्रज्ञेची मुळाक्षरं




                                संपादक 
                            अक्षय घोरपडे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

  • प्रज्ञेची मुळाक्षरं (दिवाळी अंक २०२५)
         संपादक - अक्षय घोरपडे.
  • Copyrights © Akshay Kishor Ghorpade, 2025

  • मुखपृष्ठ - विजयेंद्र पाटील या मित्राच्या परसबागेत कमळाच्या उगवलेल्या फुलाचे छायाचित्र. 

  • रेखाटणे - © सुनिल अभिमान अवचार.

  • छायाचित्र - © आनागामी

  • या दिवाळी अंकात व्यक्त झालेली मत, विचार आणि सर्जनशील अभिव्यक्ती  ही त्या लेखक कवींची  असून त्याचे सर्वाधिकार हे त्यांचेच आहेत. त्याच्याशी संपादकाचा संबंध नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




संपादकीय

प्रज्ञेची मुळाक्षरं दिवाळी अंक २०२५ प्रकाशित करतांना मनस्वी आनंद होत आहे. दीपावली हा भारतीयांचा सण आहे. या सणाला अनेक संदर्भ असून सर्व भारतीय हा सण उत्साहात साजरा करीत असतात. घरोघरी दिवे उजळतात. दिव्यांच्या रोषणाईने आसमंत उजळून निघतो. उजळणारा प्रकाश अंधारावर मात करतो. लाक्षणिक अर्थाने बघितले तर मनात साचलेले निराशेचे मळभ दूर सारून आशेच्या प्रकाश किरणात आपले जीवन उजळवले पाहिजे हे सांगणारा हा सण आहे.

      या सणानिमित्ताने साहित्याच्या क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण असते. दीपावलीचे औचित्य साधून वाचकांना साहित्याची मेजवानी घडावी. जुन्या आणि नव्या साहित्यलेखकांचा तसेच त्यांच्या लेखनाचा परिचय घडावा यासाठी दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. वाचक ही या दिवाळी अंकांचे जोरदार स्वागत करतात. दिवाळी अंकांवर प्रतिक्रिया देतात. म्हणून माझ्या ब्लॉगच्या निमित्ताने आपणही दिवाळी अंक प्रकाशित करावा हा विचार माझ्या मनात आला. ऑनलाईन पद्धतीने ब्लॉगच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोचवावे. आणि त्यांना साहित्याची मेजवानी घडवावी. या हेतूने हा दिवाळी अंक प्रकाशित करीत आहोत. ब्लॉगवर प्रकाशित होणारा हा पहिलाचं दिवाळी अंक असावा.

    या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य असे की, या अंकात आम्ही कवयित्री अनुसयाबाई फकिरा इंगळे यांची कविता प्रकाशित करीत आहोत . खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी  यांच्या समकालीन असणाऱ्या  अनुसयाबाई फकिरा   इंगळे या आहेत. खानदेशातच वास्तव्यास असणाऱ्या अनुसयाबाई यांची  कविता ही खानदेशातच बहरली.  ही कविता प्रकाशित न झाल्याने  ही कविता दुर्लक्षित राहिली. अन्यथा आणखी एका खान्देश कन्येच्या कवितेचा परिचय मराठी कवितेला झाला असता आणि मराठी कविता समृद्ध झाली असती. अनुसयाबाई यांच्या कवितेचं लेणं मराठी वाचकाला परिचित व्हावं आणि उशिरा का होईना या कवितेचा परिचय मराठी वाचकाला  करून देण्याचं काम या दिवाळी अंका निमित्ताने आम्ही करीत आहोत. लवकरच माझ्या ब्लॉगवर या कवितेच्या रूप सौंदर्याचा आढावा घेणारा समीक्षणात्मक लेख मी प्रकाशित करणार आहे.   

       किशोर घोरपडेशशिकांत हिंगोणेकरमधुचंद्र भुसारेवेणुप्रशांतडॉ.मिलिंद विनायक बागुसुनील लोणकरकैलास भालेमहेंद्र गायकवाडउत्तम बावस्करप्रशांत वंजारे, अक्षय घोरपडे, सुरेश साबळे, सुनील अवचार,गणेश रघुनाथ राऊत, दिनेश  मुडे , रवींद्र पांढरे , आत्माराम गोडबोले, सचिन व्ही. काळे, डॉ.अमृत खाडपे आदी लेखकांच्या साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे. या लेखकांनी आपले लेखन प्रकाशित करण्यास पाठवले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.

      तसेच माझे जिवलग मित्र सुनील अवचार याने आपली रेखाटणे दिवाळी अंकासाठी पाठवली त्याबद्दल त्यांचे आभार. माझे दुसरे जिवलग मित्र विजयेंद्र पाटील यांनी त्यांच्या परसबागेतील नुकत्याच उगवलेल्या कमळाच्या फुलाचे छायाचित्र घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आनागामी यांनीही छायाचित्र घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.रसिक वाचक या अंकाचे स्वागत करतील ही अपेक्षा.   


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



अनुक्रमणिका


कविता 

         अनुसयाबाई फकिरा इंगळे, किशोर घोरपडे, शशिकांत हिंगोणेकर, मधुचंद्र भुसारे, वेणुप्रशांत, डॉ.मिलिंद विनायक बागुल, सुनील लोणकर, कैलास भाले, महेंद्र गायकवाड, उत्तम बावस्कर, प्रशांत वंजारे , सुरेश  साबळे,  अक्षय घोरपडे, संजय भानुदास इंगळे, सुनील अवचार, गणेश रघुनाथ राऊत, दिनेश मुडे.

कथा 

        रवीन्द्र पांढरे, आत्माराम गोडबोले, सचिन व्ही.काळे.

चित्रपट गीत समीक्षा

                       डॉ.अमृत खाडपे .   


                           
©Aanagami




----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



कविता

©Sunil Awchar

दिवाळी आणि भाऊबीज

दिवाळी सण 

कधी येईल बिचारा              

बंधुले ओवायाले           

सण नहीं दूसरा                

सासू आत्याबाई पाया

लागते घाई घाई         

वर्षाची दिवाळी वाट

पाहये  मायबाई                     

सासू आत्याबाई                       

पाया लागते बागात

दिवाळीचे मूळ भाऊ

चालले रागात ३॥      

दिवाळीच्या दिवशी

माझ्या ताटात मोती

ओवाळ्याले  जाते                           

राणी भावजयचे  पती ४॥                 

भाऊबीजेच्या दिवशी

भाऊ ओवाळते तुला           

तुझ्या कमरेचा शेला

त्याची चोळी शिव मला ॥५             

                   -कवयित्री अनुसयाबाई फकिरा इंगळे.

🍁🍁🍁


पोबारा     
                                           
काळोखाची धास्ती                            
म्हणूनच सूर्याबरोबर दोस्ती केली
त्यावर भर टाकून मी
बेफिकर – निर्धास्त.

दूरवर काळोखी सळसळीचा
तोच तो भास
बघतो तर
सूर्यानेच पोबारा केला.

          -किशोर घोरपडे.

🍁🍁🍁

सजगच

मी कविता लिहितो

तेव्हा अंतर्बाह्य जागाच असतो

तसा हा काळही

मला झोपू देत नाहीय 

कालही काळ 

छलदायी होता

आजही आहेच

उद्याही अधिकच 

रक्ताळलेला असेलच

कविताही

हे सारे अनुभवते आहेय
म्हणून तीही मला 

स्वस्थ बसू देत नाहीय 

अंतर्बाह्य कविताही
सजगच झालीय आजकाल. 

          -शशिकांत हिंगोणेकर. 

🍁🍁🍁
©Sunil Awchar
                                                                                                                    

भूक गझल

भाकरीवर त्यांच्या तुपाची धार होती                         

भूक आमची उंबरठ्यापार होती.

ताटात होते नाचत नाना पंचपक्वान्न

पिठास मिठाची मारामार होती.

रोज महालात झडती जेवणाच्या पार्ट्या

गरिबांची भूक कुठे संपावर होती.

त्यांची निघालीत लफडी चव्हाट्यावर

त्यांची ती वासना धुवांधार होती.

आमचे कनेक्शन केव्हाच काटलेले

आश्वासनांची आरोळी कव्हरक्षेत्रापार होती.

पोटावर मारलेले, पाठीवर मारलेले

उमटल्या वळांची खूण निळीशार होती.

खूप सोसले, दुःखास मी थोडे तासले

वेदनेच्या आरोळीत थोडी एल्गार होती.

                                 - मधुचंद्र भुसारे.

🍁🍁🍁

गझल

सुखाच्या सुगीवर झडप पाखरांची 
जखम मात्र रक्ताळली भावनांची

दिली मूठमाती सुखाला सुखाने
अवस्था कळावी कशी दु:खितांची

सदा वास्तवाचा इथे दाह आहे
करपली पिके अंतरी कामनांची

जिथे गार हिरव्या सुशोभित डहाळ्या
लटकतात तेथे मढी जीवनांची

विकत न्याय मिळतो इथे खाटक्यांना
जरी रोज कत्तल उमलत्या कळ्यांची

सुरक्षित कुठे ना शहर राहिलेले
गिधाडे फिरकतात सदा वासनांची

लुटारू इथे आज मस्तीत आहे
मजा फार झाली खरी चोरट्यांची
          
                        - मधुचंद्र भुसारे.

🍁🍁🍁

व्हावे लागेल सूर्य

तरुणाईच्या ऐन उमेदीच्या काळात

खळखळून हसतोय

बेरोजगारीचा राक्षस

सरसकट खाजगीकरणातून

फोफावतेय

उन्मादी भांडवलशाही

आगीच्या लोळासारखी

सांप्रदायिक विषमतेचे विष

कालवले जातेय

राष्ट्रवादाच्या नावाखाली

ज्यांच्या वैचारिक दारिद्र्याची 

कीव यावी ते पुढारी

केवळ चिखलफेक करण्यात मग्न

सामान्य माणसा,

व्हावे लागेल तुला सूर्य

उद्याची पहाट पहायची असेल तर.

                         - वेणुप्रशांत. 

🍁🍁🍁


माणसं शोधावी लागतात तेव्हा.....

मी 

माणसं शोधत असतो 

माणुसकीचा गहिवर शोधणारी 

भाकरीला आकार देणारी 

अन् 

भाकरीला शेकणारी सुद्धा 

मी 

निश्चितच माणसं शोधत असतो 

जात धर्माच्या पलीकडची 

माझ्याकडची रोटी शेजारी देणारी 

अन् 

शेजार माणुसकी धर्म जपणारी जोपासणारी 

मी 

माणसातलाच माणूस शोधत असतो 

भाकरी रोटीशी इमान राखणारी 

अन् 

इमानाला जागणारी सुद्धा 

मी 

खरंच माणूस शोधतोय 

भारतीयत्वाची जाणीव असणारा 

देशाचा तिरंगा मजबूत हातात धरणारा 

अन् 

माणसाशी माणसाचचं नातं जोडणारा 

मी 

पेरत चाललोय माणूस आणि इमान 

पीक येईल तेव्हा येईल 

मी 

आशावादी राहील माणूसच माणसाला जागवेल तेव्हा....

                              - डॉ.मिलिंद विनायक बागुल. 

🍁🍁🍁


शहारुन जातो  मीही  

वर्षाकाठी, दसरा दिवाळीला घराच्या भिंती, अडगळीतल्या सामानावरील साचलेली धूळ, जळमटे साफसुफ करताना

अगदी सराईतपणे तिच्या हाताचा स्पर्श

जेव्हा फिरू लागतो अलगद

एकेक वस्तूवरून, सामानावरून..

तेव्हा,

त्या निर्जिव वस्तूही, चकाचक होऊन बोलू लागतात माझ्याशी..

दिवगंत आईचा फोटो छातीशी घट्ट धरून  साफ करून परत भिंतीवर लटकवताना शहारून जातो क्षणभर मीही...

घरालाही हवा असतो स्पर्श  आपुलकीचा, मायेचा

मनाच्या कोपऱ्यात ही दडलेली, साचलेली असतात जी काही किल्मिशे..

अंतरंगाच्या खिडक्या, दरवाजे सताड ऊघडे होतात यावेळी

साफसफाई निमित्ताने ऊजळतो जो भूतकाळ,

होते जी पडताळणी

तो एक मागोवा असतो, विसावा असतो

दमभागल्या आयुष्यासाठी..!

                     - सुनील लोणकर.

🍁🍁🍁



ओठावर हलकं हसू ठेवून

ओठावर हलकं हसू ठेवून
मधुर वाणीने बोलणाऱ्या तुमच्या
सदा प्रसन्न चेहऱ्यामागे दडलेले असतात तुमचेच कितीतरी बेरहम क्रूर चेहरे

आणि लटकेच आशीर्वादासाठी उंचावलेल्या तुमच्या दोन हाता व्यतिरिक्त 
चाकू, सुरे तलवारी, भाले ,बरची ,त्रिशूल ,बिचवा साई आणि खंजीर घेऊन उतरतात रस्त्यावर तुमचेच अगणित अदृश्य हात

किती आश्चर्य!

 फुगवून फुगवून दिसणार तुमचं ते 
अक्राळर विक्राळ रूप 

अनेक चेहरे तुम्हाला 
तसेच अनेक हात 

एकच धड
आणि एकच गुदद्वार.

 युगान युगापासून तुम्ही कापणी करत

 घर ,गाव, शहर, राज्य ,देश आणि जग
 तुडवित आलात

 तुमच्या वाटेत माणूस पेरा करताना
 येशू सुळावर चढला

 गोतमाने राजपाट त्यागला 
आणि मोहम्मद मक्केतून बहिष्कृत झाला तुमच्या खंडणीसाठी.

 खरं म्हणजे 

रात्री झोपतो 
तसेच सकाळी उठावे 

आणि जेवढी भूक तेवढीच भाकर हवी होती आम्हाला 
तर मग तुम्ही एवढे अगतीक कसे झालात?

मला तर तुमची दयाच येते
 कारण हे विश्व आहे त्यापेक्षाही अधिकच विस्तारत आहे

 आणि तुमच्या तर खूप मर्यादा आहे
 खंडणी खोरांनो.
                
                     - कैलास भाले.
🍁🍁🍁

कोळसा

अरे ! तुम्ही 
अंधाराच्या भितीने
अध्यात्मता बहाल केली
मी अद्यापही पृथ्वीच्या पोटात 
काळा कोळसा होऊन जगतो.                                                        

                - महेंद्र गायकवाड.    
🍁🍁🍁                                                                                                 
© Aanagami
                                   

इस्कोट

बांधावर गुडघे मिठी घालून 
बसलेला शेतकरी बाप 
त्याची शून्यात नजर 
डोळ्यान पाहिलेली हिरवी सपनं
पुराच्या पाण्यासोबत वाहून गेलेली
पीकपाणी, गुरंढोरं, घरदार 
सारं व्हत्याच नव्हत झालं !
पांढऱ्या कावळ्यांनी वांझोटी 
अस्वासनं फेकली त्यांच्या तोंडावर 
अस्मानी संकटामुळे 
कंबर मोडलेला शेतकरी बाप 
आता पुन्हा कवा उभा राहील?
त्याच्या दुखाचा ओला दांड
वाहतच राहील अव्याहत !

           - उत्तम बावस्कर. 
🍁🍁🍁

दिशा 

ते असतात 
ठार आंधळे 
काळोखाचे उपासक 

त्यांना ठेवायचा असतो उजेड दाबून 
व्यवस्थेच्या चिरेबंद खोलीत 

त्यांच्या दिशांना 
नसतात कुठलेही संदर्भ 

त्यांना घालायचे असतात 
तर्कविहीन घोळ 
उठवायचे असतात 
गैरसमजाचे लोळ 

म्हणूनच 
ते नाकारत असतात आपली 
सूर्योन्मुखी दिशा 

        -प्रशांत वंजारे.
🍁🍁🍁

कविता वाचून मरत राहू....

या वाटेला वळण नाही 
या शब्दाना गाळण नाही 
हा स्वप्नांचा हरवलेला प्रदेश 
आणि सत्तेचा निरंकुश जाळ
भाद्रपदाचं अलौकिकत्व सांगणारं तुझं हे संतमहात्म्य
बॉम्बवर्षावात तडफडून उध्वस्त झालेली ही घरं
माणुसकीच्या जाहीरनाम्याची घरभर पसरलेली रद्दी
हे चक्रधरा !
लगाम घाल आकाशात उधळणाऱ्या तुझ्या इच्छांच्या श्वापदांना 
अन्यथा 
आम्ही शायरीसाठी पेटवलेल्या शमेसारखे जळत राहू 
कविता वाचून मरत राहू......
                             -अक्षय घोरपडे .
🍁🍁🍁

बाप

व्यवस्थेच्या असंख्य भिंती
जीवन जगण्यासाठी असह्य, 
अंगातून निघणाऱ्या जाळांसह 
घामातून निथळणाऱ्या जीवनाला 
आकार देण्यासाठी धडपडणारा 
बाप-

रात्रंदिन गावभर 
हिरवी स्वप्न अंथरताना, 
मनांचा तळ शोधत 
प्रसंगी व्यवस्थेशी 
दोन हात करण्याची 
तयारी ठेवणारा 
बाप-

सकस सांस्कृतिक दृष्टीने 
बदलविण्यासाठी दिशांचे संदर्भ 
पुढचे पाऊल पुढेच टाकणाऱ्या बापाच्या 
आभाळभर स्वप्नांना देण्यासाठी आकार 
आता झालेच पाहिजे सज्ज 
संघटितपणे.......
संघटितपणे....
संघटितपणे......

                    -सुरेश साबळे.
🍁🍁🍁

स्ट्रीट पेंटर

तो काळ्या कलरभरल्या ब्रशने काय रंगवतोय?

माणूस!

हां हां माणूस-

निश्चितच माणूस !

अरे ss अरे ss

या चित्रातील माणसाची बुबुळे

कोणत्या गरम लोखंडी सळ्यांनी काढली असतील ?

याचा काय अर्थ?

पेंटरला उद्याच भविष्य दिसतंय !

                     -    सुनील अवचार.

🍁🍁🍁


नैतिक / अनैतिक

 जेंव्हा केंव्हा

चित्रकार, कवी, लेखक, संगीतकार

एका झेंड्याखाली येतात

स्वतःचा विवेक गहाण ठेवून

तेंव्हा आपण समजून घ्यायचे की,

आता वेळ आली आहे.....

सर्वांनी एकत्र चिंता करायची......

                 -सुनील अवचार.

🍁🍁🍁


चाहूल ऋतुराजाची

अवचित येते धुंद वादळास  उधाण ॥
स्वच्छंद पाऊसही घाली भूवरी थैमान ॥१ ॥

वादळ वारा पाऊस धारा मांडतात पळभर उच्छाद ॥
होऊनी तृप्त वसुंधरा तप्त मरुतही वाहतो आल्हाद ॥ २ ॥
                               
होता आगमन श्रावणाचे सुरू असते वरुणाचे  येणे जाणे ॥ 
वाटते बहाल केले वसुंधरेला निसर्गाने हिरवे लेणे ॥३ ॥
           
बालकांना येते  उधाण वृद्धांमध्ये येतो त्राण ॥ 
गुणगुण्यात सृष्टीचे गाणे वसुंधरा होते रममाण ॥ ४ ॥

चाहूल लागता थंडीची म्हणती सर्व आला हिवाळा ॥
असते थंडी गुलाबी वृक्षांस येते  अवकळा ॥ ५ ॥
                                 
होते नाहीशी वृक्षांची ही जीवघेणी अवकळा ॥
निसर्ग फिरवितो कांडी जादूची करून बहाल उन्हाळा  ॥६ ॥    

निसर्गासम ममता न करे कुणी चराचरावर॥ 
कृपादृष्टी निस्वार्थ असे सदैव पृथ्वीवर ॥ ७ ॥                         

                               -संजय भानुदास इंगळे.
🍁🍁🍁


जगण्याचा ज्वलंत पाढा'


वीटभट्टीवर थापलेल्या वीटेखाली
बाराखडीची एकेक अक्षरं 
दफन होत असतांना 
'अशफाक'
धुरा आडून पाहतोय 
लांब वरची शाळा 
मातीच्या लगद्यात 
तुडवत जातोय 
जगण्याचा ज्वलंत पाढा .

भाकरीच्या सोयीसाठी 
बापानं
बळजबरीनं ऊसतोडीवर आणलेली 
'शेहनाज'
भरल्या डोळ्यांनी 
मनात आठवत राहते
'ताराच्या शाळेचं गाणं'
स्वप्नांची भाकर करपली तरीही,
मांडत नाही 
कोणतंच वास्तव गाऱ्हाणं .

जळून चाललंय उरलं-सुरलं बालपण
खुरगटून गेलीय अक्षरपेरणी
यांच्या भुकेला शिवली नाही
कुठलीच इयत्ता 
कोणतीच उजळणी.

वाडी-वस्तीवरचा हा भयाण
काळोख
जाळत राहतोय कोवळी पानं..
फुलण्याआधीच खुडल्या जातंय
अंकुरणारं नवं गाणं..

परिस्थितीचा हा भयाण सुरुंग 
उधळून लावतोय 
हे उमलणारं निरागसपण...
'पोरा,तूच सांग
कोणत्या नकाशात शोधू
तुझं हरवलेलं बालपण??'

             -गणेश रघुनाथ राऊत.

🍁🍁🍁

सिंगल कॉलम आयुष्य.....

रोजंदारीचे
ओझे 
उचलताना...
उमेदीच्या दिवसाचे महत्त्व कधी कळालेच नाही.
सूर्य
माथ्यावर 
आल्यावर भान आलं...
वळून 
पाहिले असता
सावली ही दिशेनाशी झाली ..
वृत्तपात्राच्या
पानावर
ब्रेकिग न्यूज देता देता
आयुष्य
 सिंगल कॉलम मध्ये
संकुचित 
होऊन बसलं...

              -दिनेश मुडे.
🍁🍁🍁

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------






' लघुत्तम कथा '

                                                        (1)

     ' पिवळं कारड '

     " का ऽ वं शालन, हा एवढा मोठा बागायतदार कंटोरच्या दुकानात आपल्या पिवळ्या कारडावाल्या लोकाहिच्या रांगित कसा? येच्याकडे कुठून अन कसंकाय आलं माय पिवळं  

कारड ".

     " तुल्हे ठाऊक नही कां बह्ये ".

     " नही माय ".

     " आवं माय तेचा पुतन्या झेडपीत निवडून नही आला कां माघंल्या साली ".

     " आसं हाये कां ! "

                                                         (2)

   ' समाजभूषण '

     शह्यरातल्या सरकारी नवकरीत दर मह्यन्याले पगारापेक्षा कैकपट काळंधन कमावून तो कोट्याधीश झाला.

     गावाकडे समाजमंदिर बांध्याले तेन्हं लाखानं देणगी देल्ही. समाजाच्या मेळाव्यात समाजानं तेचा ' समाजभूषण ' म्हणून गौरव केला.

                               - रवींद्र पांढरे.

🍁🍁🍁

कथा

ओव्हरटेक

      डोसक्यावर काळेकुट्ट टांगते ढग. समद्या शिवारावर काजळ शिंपडल्यासारखं वाटत व्हतं .काळोख दाटून आला व्हता .मध्येच विजांची सळसळ. मेघांचा गडगडाट. कानठळ्या बसणारे आवाज. पाऊस कधी ईल ह्याचा नेम नाही.

       आसं मनाय उशिरा पाऊस सुरू झाला. सोबतीनं विजांचा थयथयाट.पावसाच्या कचाट्यात समदं शिवार सापडलं. झाडाजुडप डोंगर दिशेने असे झाले. गाडीच्या टपावर खडे पडावे तसा पाऊस आदळत  व्हता .पावसाच्या ओल्याचिंब धुक्यात समदं  एकजीव झालं. व्हत . त्यातूनही वाट काढत जो तो आपल्या मुक्कामाकडे निघाला व्हता .

         काळी कुळकुळीत सडक अनेक मोटारीना  अंगावर घेऊन धावत व्हती. काराटेंपो, ट्रका ह्येंची  रांग लागली व्हती .समद्दनं  आपल्या गाड्यांचे हेडलाईट, इंडिकेटर्स लावले व्हते. तेवढ्याच काय तो त्या अंधारात दिलासा. त्यांचं चमचमणं जिवाला सुखवित व्हतं . व्हायपर्सची स्पीड वाढली व्हती. म्हागचा पुढचा अंदाज घेत ड्रायव्हर आपल्या पद्धतीने गाड्या चालवत व्हंते. झाडं झुडपं थरथरत व्हंते .त्यात मध्येच विजंचं पातं सळसळायचं अन काळीज लख्खकन करायचं

         मग एक / दीड तासानंतर पावसानं मारा बंद केला. आन् रोडवरच्या गाड्या ठळक दिसू लागल्या. संमद्या गाड्या स्वच्छ धुऊन निघाल्या व्हत्या. एकदम चकचकीत. रंगीबेरंगी पाखराची पंखवीत तशा गाड्या चमकत व्हंत्या. त्येंच काच चकाकत व्हतेअनेक गाड्यांनी आपल्या काचेवरपाठीवरपोटावर देवाधर्माचे, वर्गाचे, पंथाचे, प्रतीकं, आकडे, चिन्ह, शब्द ,विचार कोरले व्हते.

 ‘स्वामीरथ

सोन्याची जेजुरी

परब्रम्हलिंग भजे पांडुरंगम्

 ‘रौद्रशंभू

जयजय रघुवीर समर्थ

जय श्रीकृष्णा

होय हिंदूच

जय मल्हार

जाणता राजा

‘Jesus +’

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे

ओम साईराम

‘786’

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

कुणी आवडला तर वाट दाखविन, नडला तर जात दाखवीन

ग्रेट मराठा

 ‘मेरा भारत महान

        असं काईबाई गाड्यांवर लिहिलेलं दिसत व्हतं. प्रा.डॉ. सुरज चांदमारे यांची गाडीही यामध्ये व्हती. ड्रायव्हिंग करत करत ते हे सर्व वाचत व्हते. त्यांनी आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर रेडियमचं निळ अशोकचक्र चिटकवलं व्हतं .

         आता अशोकचक्र म्हटल्यावर आपण भारतीय असल्याची ती खरी ओळख आहे. पण महाराष्ट्रातील ती नवबौद्धांची ओळख ठरली आहे. एका नजरेत ओळखलं जायचं की ही जयभीमवाल्यांची गाडी हाय मनून.आसं असलं तरी प्रा. सुरज चांदमारे गाडीवर अशोकचक्र चिटकवून साऱ्या महाराष्ट्रभर प्रबोधनानिमित्त फिरत व्हते.

      अशोकचक्र चिटकवण्यात त्यांना वावगं असं काही वाटत नव्हतं. प्रत्येकजन आपला धर्म ,पंथ, वर्ग आपापल्या पद्धतीनं अनुसरतो. आपण कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या विचारधारेचे अनुयायी आहोत, हे जमेल त्या ठिकाणी, जमेल तेवढे अधोरेखित करण्याचा जो तो प्रयत्न करतो.

            घराचे दरवाजे, भिंती, मोटर- बाईक, कार यावर आपापल्या धर्माचे, देवदेवता, चिन्हे, प्रतिकं, शब्द, विचार अनेकजण डकवित असतात. मनात धर्म ठेवण्यापेक्षा आता तो जास्त जनातच दाखवण्याची चढाओढ लागली आहे.मी असा धर्माभिमानी आहे हे पुन्हा पुन्हा गिरविलं जातं. आणि याचे लाभ ही होतात. ख्रिश्चन, हिंदू, जैन ,मुस्लीम यांचं तर हे कवचंच आहे .याच्या उलट नवबौद्धांचं आहे. त्यांनी असं काही लिहिलं तर ते मान्य होत नाही. त्यांना व्देषाच्या विषारी डोहात बुडवलं जातं. मत्सराचे गतीरोधक जागोजागी उभे केले जातात. हाटकून भांडण काढलं जातं. चुकून टाचणी तरी टोचली तर लगेच तलवार उपसली जाते ...

     ... आताबी तसंच झालं. डॉ. सुरज चांदमारे यांच्या गाडीसमोर होय हिंदूचअसं काचेवर भगव्या रंगानं लिहिलेली गाडी चालली व्हती. तिचा स्पीड अतिशय कमी व्हता. ना ती स्वतः स्पीडनं जात व्हती ना दुसऱ्याला जाऊ देत व्हती. आम्ही कसंही चालतो तरी आम्हाला कोणी बोलू शकत नाही असा त्यांचा अविर्भाव व्हता .पाच / दहा मिनिटं झाली पण गाडीची गती काही वाढत नव्हती. आन् प्रा. चांदमारेंना तर जायची घाई व्हती. त्येंला एका ठिकाणी वेळेत  पोहचायचं व्हतं. शेवटी त्येंनी हॉर्न वाजवून साईड मागितली .पण गाडीतले पोरं काही दात देत नव्हते. त्येंचं हासणं, खिदळणं चालू व्हतं.

        शेवटी सुरज चांदमारेंनी थोडा रुंद रस्ता दिसताच आपल्या गाडीची स्पीड वाढवली होय हिंदूचला ओव्हरटेककेलं . अन् बघता बघता तसल्या पावसाळी हवेत ठिणकी पडली.

      ‘माईला सद्या, जयभीमवाल्याची गाडी दिसाल्याय...

कस्याऊन ?’

माईला तुझ्य, तुला अशोकचक्र दिसंनाय का?’

ड्रायव्हर सीटच्या बरोबर म्हागं बसलेला दणकट पोरगा बोलला .

    ‘अशोकचक्र आसलं मनून काय झालं? जयभीमवाल्यांचीच आसलं कस्यावरून?’ ड्रायव्हींग करणाऱ्यानं उगंच शंका घेतली.

    ‘माईला तुज्या जयभीमवाल्यासिवी कोण लावतंया आशोकचक्र...

   ‘मंग आता रं?’ दुसरेच दोन पोरं प्रश्नार्थक बोलले.

 ‘गाडी पुडी घे, माईला आपणाला ओव्हरटेक’ ?’

त्या पोरांना त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणं अपमानित वाटलंच. पर एक नव- बौद्ध आपणाला ओव्हरटेकयाचा संताप जास्त आला. त्येंला ह्ये सहनच झालं नाही. त्येंचा तो म्होरक्या तर सारखा फुरफुरत व्हता.

      ‘ओव्हरटेकमग ते गाडीचं असो की राजकारणातलं, साहित्यातलं असो सामाजिक क्षेत्रातलं, खेळातलं असो की सांस्कृतिक क्षेत्रातलं‌. एक दलित आपणाला ओव्हरटेक करतोय ही कल्पनाच डोकं तडकवणारी. यातून कोणीही सुटलं नाही. पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्यांनासुद्धा हे चालत नाही. बाकीच्यांची तर कथाच निराळी. खासगीत समदी चर्चा जातीला केंद्रस्थानी ठेवून. समदं जोखणं जातीला धरूनच. मंग तुम्ही स्वतःला सोळा आणे सिद्ध केलं तरी.

    ‘ ... मी अशा प्रवृत्तीचा धिक्कार करतो हा एक प्रकारे आंबेडकरी विचारांना दाबण्याचा प्रकार आहे...एक ‘... प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे राहण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्या घरावर, गाडीवर, इच्छा असेल तर आपल्या धर्माचे चिन्ह, प्रतीक आपण लावू शकतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. पण काही धर्मियांना ही केवळ आपलीच मक्तेदारी वाटते...दोन

      ‘समूहाला मन नसतं तर ताकद असतेसमूहाकडे विचार नसतो तर शक्ती असते. आणि या शक्तीच्या जोरावर  ते इतरांची प्रतीकं पुसण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रकार प्रा. चांदमारे सरांच्या बाबतीत झाला  आहे. आणि तो अतिशय निंदनीय आहे...तीन.

      प्रा सुरज चांदमारे यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याचा निषेधार्थ शहरातील एका महाविद्यालयाल निषेध सभा आयोजित केली व्हती. प्राध्यापक, वकील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. स्वतः प्रा. चांदमारे सुद्धा हजर व्हते. त्यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग सभेला सांगितला...

.    ... ‘होय हिंदूचचक्क गाड्या गाडीच्या समोर आणून उभी केली अन् त्या चार-पाच पोरांनी त्येंच्या गाडीला घेरलं. काचंवर मुठी आदळून लागल्या. एकानं तर चक्क दरवाजालाच हात घातला.

     ‘ उत्तर खाली...

       ‘भोसडीच्या उतर लवकरते चारपाच चेहरे क्रोधाने बघत व्हते.

     त्यातला एकाचं लक्ष पुस्तकावर गेलं. चारपाच पुस्तकं व्हती. एकावर बाबासाहेबाचं चित्र व्हतं, ते पाहून तर ते जास्तच बिथरले.

       ‘बाहेर निघ. का ओढून काढू...?’ ती पोरं त्येंला आव्हान देत व्हती .

      संकटाशी सामना कसा करावा? असं भाषणात सांगणारा प्राध्यापक. तथागतांचं , बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान सांगणारा प्राध्यापक या प्रसंगातून बाहेर कसं पडावां ह्येचा विचार करीत व्हता. त्येलाही राग येत व्हता. पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्येनं राग आवरला. आन् मोठ्या धीरानं, आत्मविश्वासानं बाहेर पडला.

 ‘बोला काय झालं. काय प्रॉब्लेम आहे?’ ‘बोला काय ऑऽऽऽ. आंगावर चिकूल बग. डोळे बंद करून गाडी चालवितोस? ऑऽऽऽ.

     त्यातल्या दणकट पोरांना गोंदलेल्या दंडावर उडालेली चिखलाचे थेंब दाखविले

       Sorry I am really very very sorry

        उडाला असेल चिखल पण मला जरा घाई होती

         प्राध्यापक चांदमऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली नम्रपणे सॉरी बोलले. पण ती पोरं ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती. तारुण्याचा कैफ मदिरेची झिंग त्यांना ढुसण्या देत व्हती. त्यामुळे  त्यांचा तोल चालला होता

        ' ss सॉरी काय ss' असं म्हणून त्या दणकट पोरांन ढकलण्याचा प्रयत्न केला.

          ' जाड्या, हात लावशील तर बघ...' चांदमारे रागाने बोलले.

           'काय करशील ? ss'  तो पोरगा निमित्त शोधत होता.

           मग मात्र प्राध्यापकाचा आवाज चढला आणि तो बोलला 'चल गाडी बाजूला घे '

         ' नाही घेतली तर...' पोरांनी भांडण उकरून काढलं.

          ठीक आहे म्हणून सुरत चांदमारे गाडीत बसले. गाडी स्टार्ट केली आणि रिव्हर्स घेऊन ते पुढे निघणार तेवढ्यात एका पोरांना हातातली दारूची बाटली मागच्या काचेवर मारली. आणि एका क्षणात गाडीची काच फुटली. अशोक चक्राचे तुकडे झाले. आरे निखळून पडले. प्राध्यापक सुरज चांदमारे यांनी पाहिलं तेव्हा त्यांच शरीर संतापाने उकळलं. डोक्यात रक्त उतरलं. ते उसळी मारून बाहेर आलं. आणि त्या पोराच्या कानावर खन्नकन वाजवली. आपण काय करतो याचं भानही राहिलं नाही. अंगातल सारा लावा त्या पोरावर ओतला. पोरगा  लोळागोळा झाला. खूप वेळानंतर जेव्हा ते भानावर आले. तेव्हा सारा ट्रॅफिक ठप्प झालं होतं.

                                                                        -आत्माराम गोडबोले.

🍁🍁🍁



कथा

बाप...बाप असतो.....!

पंच्याहत्तर वर्षाचे भास्करराव आज शुद्धीवर आले होते. गेल्या तीन दिवसापासून आयसीयु मध्ये अॅडमिट होते. सकाळी फिरायला जाणे ही त्यांची रोजची सवय. असेच तीन दिवसापूर्वी सकाळी फिरायला गेले असतांना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. त्यातच मेंदूला जबर मार लागल्याने ते हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते. मेंदूमध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे होते. परंतू ते शुद्धीवर येणे आवश्यक होते. त्या शिवाय ऑपरेशन करणे शक्य नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांना शुद्ध आली होती. लवकरात लवकर त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे होते. नसता परत शुद्ध हरपून ते कोमात जाण्याची शक्यता होती.

म्हणून डॉक्टर गडबड करत होते. डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला आयसीयुमध्ये बोलावून घेतले. डॉक्टर मुलाला सांगत होते. बाबांच्या मेंदूला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव जास्त झाला आहे. तात्पुरता आपण तो बंद केला आहे. परंतू ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रक्तस्त्राव पूर्णपणे बंद होऊ शकणार नाही. ऑपरेशन केले नाही तर ते कायमचे पॅरलाईज होऊ शकतात किंवा कायमचे कोमात जाऊ शकतात. ऑपरेशनचा खर्च साधारण पाच लाख येईल. काय करायचे ते लवकर ठरवा.असे त्यांनी सुमितला सांगितले. वास्तविक ही गोष्ट भास्कररावांसमोर बोलणे उचित नव्हते. ते नेमकेच शुद्धीवर आले होते. पण डॉक्टरांनी वेळ जाऊ नये. म्हणून सुमितला आयसीयुमध्ये बोलावून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सुमितच्या डोळ्यात पाणी तरळत होते. एक तासात निर्णय सांगतो. म्हणून तो बाहेर निघून गेला.

डॉक्टर व सुमितमधील बोलणे भास्कररावांनी नेमके ऐकले. त्यांच्या ही डोळ्यात पाणी आले. डॉक्टर त्यांना तपासून निघण्यासाठी वळले. तेवढ्यात भास्कररावांनी डॉक्टरांचा हात धरला आणि हातातल्या सलाईनच्या नळी सह डॉक्टरांना हात जोडून कापऱ्या आवजात ते बोलू लागले. डॉक्टर साहेब मला शुद्धीवर आणल्याबद्दल आपले धन्यवाद. माझी तुम्हांला एक विनंती आहे आणि ती विनंती तुम्ही मान्य करावी. ही माझी शेवटची इच्छा समजा. डॉक्टर साहेब  तुम्ही माझ्या मुलाला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकले. माझे आता वय झाले आहे. आजपर्यंत माझे सगळे आयुष्य कष्टातं गेले. पण सगळ्यांचे करता-करता आयुष्य आनंदात जगलो. कधी कशाची तक्रार केली नाही. हे सगळे करतांना कर्जाचा डोंगर झाला. तो डोंगर उतरता-उतरता कधी इथं पर्यंत पोहचलो ते लक्षात ही आले नाही. या कर्जाच्या डोंगरामुळे माझ्या कुटूंबासाठी मला हवे तसे काही करता आले नाही. माझ्या लेकरांचा हट्ट कधी पुरवता आला नाही. मीठ भाकरी खाऊन माझी लेकरे शिकली. कधी कसला हट्ट त्यांनी केला नाही. पोरगा लहान वयात काम करून शिकला. कधी कशाची मागणी त्याने केली नाही. चांगला शिकून आता नोकरीला लागला आहे. माझ्याकडे लक्ष ही देतो. माझी, त्याच्या आईची काळजी ही घेतो. आता नव्याने त्याचा संसार ही सुरु झाला आहे. पोरगी ही तिच्या घरी सुखी आहे. तिने सुद्धा कधी कसला हट्ट केला नाही. डॉक्टर साहेब माझे सगळे आयुष्य कर्ज फेडण्यात गेले. आता माझ्या ऑपरेशनसाठी माझ्या पोराला पण कर्ज काढावे लागेल. माझ्यासाठी तो कसला ही विचार न करता ते ही काढेल. मला माहीत आहे. पण डॉक्टर साहेब माझे आयुष्य जसे नुसते कर्ज फेडण्यात गेले. तसे त्याचे नको जायला. लहानपणापासून तो कष्ट करत आलायं. आताशी कुठे त्याचा सोन्या सारखा संसार सुरु झालायं. मी जे कर्ज फेडताना भोगले. माझ्यासाठी माझ्या लेकराला भोगायला नका लावू. उलट मला सुट्टी द्या. इथे दवाखान्यात जीव ठेवण्यापेक्षा माझ्या घरात, माझ्या लोकांमध्ये शेवटचा श्वास घेतला. तर जीव कशात गुंतणार नाही. जे घर घेण्यासाठी व बांधण्यासाठी कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी माझ्या लेकरांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही. त्या घरात मला माझा देह ठेवू द्या. माझे ऑपरेशन करू नका. माझ्या लेकराला माझ्यासाठी आयुष्यभर कर्ज फेडायला नका लावू. जगू द्या त्याला आनंदाचे दोन दिवस. आता जगून तरी काय करू? असे अधू होऊन लेकाच्या जीवावर जगण्यापेक्षा देवा घरी गेलेले बरे. ही माझी शेवटची इच्छा समजा.

हे सर्व ऐकतांना डॉक्टरांच्या ही डोळ्यात पाणी आले. भास्कररावांचा हात धरून ते त्यांना म्हणाले, “बाबा काळजी करू नका तुमच्या मुलाला आयुष्यभर कर्ज फेडण्याची वेळ येणार नाही. शासनाने तुमच्यासाठी सोय उपलब्ध केली आहे. आपण शासकीय योजनेतून तुमचे ऑपरेशन करू. एक रुपया ही तुमच्या मुलाला कर्ज होणार नाही. काळजी करू नका सगळे चांगले होईल. मी सांगतो तुमच्या मुलाला काय करायचे ते चिंता करू नका.डॉक्टरांनी स्वत:चे डोळे पुसले आणि स्वत:शी पुटपुटले खरचं बाप.......बापच असतो.

                                                                      -सचिन व्ही.काळे.

🍁🍁🍁

 

 

©Sunil Awchar

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


चित्रपट गीत समीक्षा

" चंदन सा बदन,चंचल चितवन "

         गुजराती साहित्यकार गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी द्वारा लिखित 'सरस्वतीचंद्र' ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे.ही कादंबरी सन 1897 ते 1902 या 15 वर्षांच्या कालावधीत चार भागात प्रकाशित झाली. याच कादंबरीवर आधारीत ' सरस्वतीचंद्र ' हा हिंदी चित्रपट इ.स.1968 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा हिंदीतील शेवटचा कृष्ण-धवल चित्रपट होता. 19 व्या शतकातील भारतातील सरंजामशाही, उत्कट प्रेम, प्रेमाची विफलता, त्याग यांचे उत्कृष्ट चित्रण यात केले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद सरैया तर निर्माता विवेक होते.

             या चित्रपटातील 'चंदन सा बदन', 'छोड दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए' , 'हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को ', ' फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं मेरा दिल हैं ', 'मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे', 'सौ साल पहले की बात है', 'वादा हमसे किया दिल किसी को दिया' ही सर्वच गाणी कर्णमधुर होती. परंतु कल्याणजी- आनंदजी यांचे संगीत, इंदीवर यांचे गीत आणि मुकेश यांच्या मखमली आवाजातील 'चंदन सा बदन चंचल चितवन' हे मला आवडलेले नितांत सुंदर गीत. 

     मनीष व नूतन यांच्यावर हे गीत चित्रित केलेले आहे. या गीतात प्रियकराने आपल्या प्रेयसीचे इतके सुंदर वर्णन क्वचितच दुसऱ्या कुणी केलं असेल.

" चंदन सा बदन चंचल चितवन

धीरे से तेरा ये मुस्काना

मुझे दोष न देना जग वालों

हो जाऊं अगर मैं दीवाना "

             चंदनासारखी तुझी ही सुंदर काया,प्रेमानं ओथंबलेली तुझी ती नजर आणि कहर म्हणजे हळूवार हास्य पसरलेली तुझी ती मुखमुद्रा. तुझे हे घायाळ करणारे सुंदर रुप पाहून मी जर वेडा झालो तर यात मात्र माझा दोष नाही.

" ये काम कमान भवें तेरी

पलकों के किनारे कजरारे

माथे पर सिंदूरी सूरज

होंठों पर दहकते अंगारे

साया भी जो तेरा पड़ जाए

आबाद हो दिल का वीराना "

             तुझ्या भुवया कामदेवाच्या धनुष्या प्रमाणे दिसत आहेत.काजळ भरलेल्या तुझ्या काळ्याभोर पापण्यांच्या त्या कडा तर फारच सुंदर.तुझ्या कपाळावरील कुंकू म्हणजे आकाशात तळपणारा लालबुंद सूर्यच.तुझे ओठ हे रखरखत्या निखाऱ्यांपेक्षा काही कमी नाहीत.तुझी सावली जरी पडली तरी माझ्या ह्रृदयाचं वैराण वाळवंट हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही.

" तन मी सुंदर मन भी सुंदर

तू सुंदरता की मूरत है

किसी और को शायद कम होगी

मुझे तेरी बहुत जरुरत है

पहले भी बहुत मैं तरसा हूं

तू और न मुझको तरसाना "  

             आपल्या सुंदर शरीरा प्रमाणे तुझे मन ही सुंदर आहे. मला तर तू सौंदर्याची देवीच वाटत आहे.कुणाला नसेल पण मला खरोखर तू हवी आहेस.मी या अगोदरही तुझ्यासाठी खूप व्याकुळ झालो होतो.आता तरी यातून माझी सुटका कर.

     या गितातील अभिनेता मनिष आणि अभिनेत्री नूतन यांचा विरह भावना व्यक्त करताना अभिनय लाजवाब आहे. शब्दांना बोलकं करणाऱ्या नरीमन इराणी यांच्या छायाचित्रणाला तर तोडच नाही.विरहाने व्याकुळ झालेल्या प्रियकराच्या आर्त स्वराला मुकेश यांच्या आवाजाने खरोखर न्याय दिला आहे.

             ' सरस्वतीचंद्र ' या चित्रपटाला 1969 चा सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा राष्ट्रीय पुरस्कार नरिमन इराणी यांना तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार कल्याणजी आनंदजी यांना मिळाला होता.फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार एस.अली रजा यांना मिळाला होता.1968 मध्ये हे गीत बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात पाचव्या क्रमांकावर होते. हे गीत ऐकल्यानंतर भूतकाळातील सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेतल्यासारखे वाटते.

                                                                                             -डॉ.अमृत खाडपे.



©Sunil Awchar





 

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...